अंतरिम अर्थसंकल्प समृद्ध व सर्वसमावेशक भारत निर्माण करण्यासाठी - सुजाता सोपारकर, अध्यक्षा- ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन

 



अंतरिम अर्थसंकल्प  समृद्ध व सर्वसमावेशक  भारत निर्माण करण्यासाठी  व अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी पोषक आहे.  विशेषतः गरीब,महिला,युवा आणि अन्नदातासाठी सक्षमीकरणाची व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देणारा आहे. 2024 च्या  विकसित भारताचे स्वप्न  साकार होतांना दिसते .

 
सुजाता सोपारकर, अध्यक्षा- ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन
 
केंद्र सरकारने विविध योजनांद्वारे सामाजिक  चार स्तंभांच्या (गरीब, महिला, युवक आणि शेतकरी) उन्नतीवर  भर दिला जात आहे ज्यामुळे तळागाळापर्यंत  सर्वांगीण आणि सर्वसमावेशक वाढ होईल. रूफटॉप सौरऊर्जाकरणामुळे  सौर आणि इलेक्ट्रॉनिक्स  क्षेत्रातील उद्योगाला चालना मिळेल तसेच गरीब लोकांच्या पैशांची देखील बचत होईल . 
 
एकाच वेळी ई-चार्जिंग नेटवर्कचा विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये सततच्या भांडवल वृद्धीमुळे  उद्योगाला चांगल्या ऑर्डर्स  मिळतील. मध्यमवर्गीयांसाठी  पंतप्रधान आवास योजनेंतर्गत  २ कोटी नवीन घरे करण्याची सरकारची योजना असल्याने गृहनिर्माण क्षेत्रातही चांगली वाढ होईल.

त्यांनी 2009-2010 पर्यंत रु. 25000 पर्यंतच्या आणि रु 10,000 पर्यंतच्या  2010-11 ते 2014-15 ह्या आर्थिक वर्षापर्यंत आयकर खात्याच्या  मागण्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने  याचा 10 दशलक्ष लोकांना फायदा होईल  व ते तणावमुक्त होतील .

काही आयात अधिसूचनांची  वैधता आणि स्टार्ट अप्सवरील प्रोत्साहन योजनेची मुदत मार्च 2025 पर्यंत वाढवल्याने सातत्य राखन्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल आहे.

एकूणच अंतरिम अर्थसंकल्पाने वाढत्या अर्थव्यवस्थेचा पाया घातला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत