ठाणेकरांनो पाणी साठवा: गुरुवारी 21 मे रोजी मुंब्रा, दिवा, कळवा सह 5 भागात 24 तास पाणीपुरवठा बंद
- कधी बंद: गुरुवार 21 मे दुपारी 12 पासून शुक्रवार 22 मे दुपारी 12 पर्यंत - एकूण 24 तास
- कोणते भाग*: दिवा, मुंब्रा, कळवा पूर्ण. वागळे व माजिवडा-मानपाडा मधील काही भाग
- कारण काय: जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात बारवी वाहिन्यांचे तातडीचे दुरुस्ती काम
- पुढे काय: पाणी सुरू झाल्यावर 1-2 दिवस कमी दाबाने पुरवठा
- धरणातील तूट: आंध्रा व बारवी धरणात पाणी कमी, 31 ऑगस्टपर्यंत कपात प्रस्तावित
ठाणे (19 मे): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात तातडीच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार, 21 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवार, 22 मे दुपारी 12 वाजेपर्यंत ठाण्यातील अनेक भागात 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या भागात पाणी बंद राहील:
1. दिवा प्रभाग समिती: संपूर्ण भाग
2. मुंब्रा प्रभाग समिती: प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता संपूर्ण
3. कळवा प्रभाग समिती*: संपूर्ण भाग
4. वागळे प्रभाग समिती: रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर
5. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती*: कोलशेत खालचा गाव
काम काय होणार?
जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरूत्ववाहिनी क्र. 1, 2 व 3 वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे MIDC कडून होणारा पाणीपुरवठा बंद राहील.
धरणातील पाणीसाठा कमी
23 एप्रिल रोजी जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीत आंध्रा व बारवी धरणातील पाण्याची तूट आणि पुढील हंगामात पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी वापराचे नियोजन करण्यासाठी कपात करण्याचे प्रस्तावित आहे.
नागरिकांना आवाहन:
1. पाणी कपातीच्या काळात पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
2. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी येईल याची नोंद घ्यावी.

Post a Comment