ठाण्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करावी

 

शिवसेनेचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या गद्दार कंपनीने ठाणे महापालिका अक्षरशः लुटून खाल्ली आहे. ठाणे महापालिकेत भिकेला लावण्याचे काम शिंदे यांनी केले असून आता अधिकारी देखील कोणाला जुमानत नाहीत. ठाणे पालिकेत लुटमार, भ्रष्टाचार सुरू असून कामांचे ऑडिट झाले पाहिजे. 

त्यामुळे चौकशी लावावी आणि सुरू असलेली लुटालूट थांबवावी अशी मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. ठाण्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी लावावी तसेच चुकीचे काम घडू नये म्हणून चांगला अधिकारी महापालिकेमध्ये पाठवावा अशी मागणी शिवसेनेचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


         ठाणे महापालिकेला स्वतःचे धरण नाही,शहरातला कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही, त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून गेल्या अडीच वर्षात नागरी कामे रखडली आहेत. याला सर्वस्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जबाबदार असून आता शिस्त लावण्याची वेळ आली आहे. चुकीचे काम घडू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे असे  देखील विचारे यांनी सांगितले. आज शिवसेना नेते राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटाचा भांडाभोड केला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत