मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज नाराज ,यशवंत सेनेने शिंदे गटाचा पाठींबा काढला



ठाणे  :  धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या  यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठींबा काढत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका व निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठींबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाने केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह  महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले.परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्याला वेळ नाही.धनगर एसटी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही.समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे.समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठींबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे,नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे उपस्थित होते  


महाराष्ट्रात धनगर समाज दोन नंबरचा समाज आहे . ठाणे जिल्हा देखील पावणे तीन लाख धनगर समाजाचे मतदान आहेत जर तुम्हाला पाठींबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे उमेदवार उभे करू  त्यांची सुरुवात ठाण्यातून करून असेही श्री गडदे यावेळी म्हणाले. आदिवासी नेत्यांनी दादगिरीची भाषा करू नये आम्हाला पण जसेतसेच उत्तर देता येतो त्यामुळे त्यांचा अरेरावीला आम्ही घाबरत नाही असेही  श्री गडदे यावेळी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत